चिमुकली पगडी झळके शिरी
चिमुकली तलवार धरी करी
चिमुकला चढवी वर चोळणा
चिमुकला सरदार निघे रणा
छ्बुकडा चिमणा करितो गुण
चिमुकले धरले मग रंगण
दुडददुडा पळ्ता पळ्ता पडे
गडबडे, रडता मुख बापुडे|
– शांता शेळके
चिमुकली पगडी झळके शिरी
चिमुकली तलवार धरी करी
चिमुकला चढवी वर चोळणा
चिमुकला सरदार निघे रणा
छ्बुकडा चिमणा करितो गुण
चिमुकले धरले मग रंगण
दुडददुडा पळ्ता पळ्ता पडे
गडबडे, रडता मुख बापुडे|
– शांता शेळके
Ne majasi ne parat matrubhumila Sagara Pran Talmalala with lyrics sung by Lata Mangeshkar, Usha Mangeshkar, Usha Mangeshkar & PT. Hridaynath Mangeshkar from the album Jai Jai Maharashtra Majha
Song: Sagara Pran Talmalala
Album: Jai Jai Maharashtra Majha
Artist: Lata Mangeshkar, Meena Mangeshkar, Usha Mangeshkar & PT. Hridaynath Mangeshkar
Music Director: PT. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Vinayakrao Savarkar
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणी । मी
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला
नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते ! जी सरिता । रे
त्वद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला
Sung by Lata Mangeshkar
Album: Aayushyavar Bolu Kahi
Music: Sandeep Khare
Lyrics: Sandeep Khare
Singer(s): Saleel Kulkarni
जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही
तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही
हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही
उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही
Album: Aayushyavar Bolu Kahi
Music: Sandeep Khare
Lyrics: Sandeep Khare
Singer(s): Saleel Kulkarni
अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दांत येते
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा
असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा
न अंदाज कुठले, न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे, न अनुमान काही
कशी ही अवस्था कुणाला कळावे?
कुणाला पुसावे? कुणी उत्तरावे?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे?
Album: Saang Sakhya Re
Music: Saleel Kulkarni
Lyrics: Sandeep Khare
Singer(s): Saleel Kulkarni
अजून उजाडत नाही ग..
दशकांमागुन सरली दशके
अन् शतकांच्या गाथा ग
ना वाटांचा मोह सुटे वा
ना मोहाच्या वाटा ग
पथ चकव्याचा गोल, सरळ वा- कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफट अवघी ! पान जळातून वाही ग..
अजून उजाडत नाही ग..
कधी वाटते ‘दिवस’ ‘रात्र’ हे
नसते काही असले ग
त्यांच्यालेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे, गंध आंधळे, भवताली वनराई ग
तमातली भेसूर शांतता ! कानी कूजन नाही ग..
अजून उजाडत नाही ग !
एकच पळभर एखादी कळ
अशी सणाणून जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे
लख्ख काही चमचमते ग
ती कळ सरते, हुरहुर उरते अन् पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण, काही आतुन उमलत नाही ग..
अजून उजाडत नाहीफ़ ग..
एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी
अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?
रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!
चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!
धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!
धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर
हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर
नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!
घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!
पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!
__कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत
जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंड्या जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.
दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मजा म्हणून सांगू
शब्दासाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.
एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.
त्याच रात्री आम्ही पांचानी
एकमेकास बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आई देखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.
नारायण सुर्वे
Bahinabai Chaudhari was born in a Mahajan family at Asode in Khandesh region of the present-day Jalgaon district on the 11 August 1880, on the day of Naga Panchami. Her mother’s name was Bhimai, and her father’s name was Ukhaji Mahajan. She had three brothers – Ghama, Gana, and Ghana, and three sisters – Ahilya, Sita and Tulsa. At the age of 13, [1893] she was married to Nathuji Khanderao Chaudhari of Jalgaon. Following her husband’s death,[1910] she led a very difficult life because of the economic, social, cultural, and emotional circumstances arising out of widowhood. She had a daughter named Kashi and two sons, Madhusudan and Sopandev (1907-1982).
‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर,
अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’
‘अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर
आधी हाताले चटके – तव्हा मीयते भाकर’
या व्यतिरिक्त आणखी मराठी कविता संग्रह वाचण्यासाठी इथे भेट द्या.